हे राम !
हे राम!
ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहताती
पंधरा रुपयांच्या रॉयल्टीवर पेन्सिलीने चिटोऱ्यावर तत्काळ लिहिलेली ही कविता, जयवंत दळव्यांच्या भाषेत चंद्र सूर्याची बटणे खमिसाला लावणाऱ्या बंडखोर लोककवी मनमोहन नातूंनी दोन महिन्यांच्या राशनसाठी एच. एम. व्ही. ला विकली अशी ष्टोरी ऐकतो.
कविता वाचताना आमचे गुरुजी रडत म्हणून आम्हीही रडू. हे गाणे संपूर्ण महाराष्ट्रात म्हटले जात असे. ज्या कवितेने आमच्या वयाचे अनेक विद्यार्थी रडले त्यांच्या निष्कपट अश्रूंची किंमत फक्त रू. पंधरा रोखीचे अन्न?
आता ही कविता आणि ते गीत नेस्तनाबूत झाले आहे.
तुम्ही नेस्तनाबूत झाला आहात हे ऐकून गालातल्या गालात हसत माझी केंड करू नका आणि ई. स. 712 मधल्या पोरी पळवून नेलेल्या दाहिर राजासारखा चेहरा तर मुळीच करू नका . आपण हिंदुस्थान आहोत की भारत आहोत अशा पेचात सापडलेल्या इंडियात, कृष्ण किंवा शिवाजी महाराजांसारखे लोकोत्तर पुरुष युगातून एकदाच जन्माला येतात त्यामुळे टोळीवाले महंमद बिन कासिम नेहमीच अंतिमतः जिंकतात. मग तो टोळीवाला कुठल्याही धर्माचा असो, हे बॅरिस्टर असून तुम्हाला कळू नये?
महापुरुष हे नेहमीच गांभिर्याने मनोरंजक विकाऊ वस्तूच होत असतात आपल्या इथे, हे सत्य तुम्हाला कधीच उमगले नाही म्हणून तर तुम्हाला खुट्याला टांगून होतं ना? कशाला उतरलात तुम्ही फोटोतून खाली. कशाला हा अट्टाहास?
तरी मी तुम्हाला सांगत होतो उभे राहू नका. हो, हो ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला सुद्धा. वुई द पिपल ऑफ इंडियात आता सगळे चर्चिल आहेत, पंचा न आवडणारे.
इंग्रज कुठेही गेलेले नाहीत, इथेच आहेत, व्हिक्टोरिया पासून भो पंचम जार्ज भूपती परेंत सर्व हिकडेच आहेत, नावे बदलून तैनाती फौजे सकट . काल पर्यंत हाफ चड्डेत दमबाजी करणाऱ्या काळ्या गाद्यारेड्यांचे शुभ्र सुगंधी नंदी झाले आहेत, एसीत बसून . बापू, चोवीस तास ए. सी. मध्ये बसून लिडर लोकांची त्वचा तेवढीच फक्त गोरी होते हृदये काळीच रहातात. दोन ऑक्टोबरला ड्राय डेची अंगारकी संकष्टी साजरी करत चरखा फिरवायला जोर यावा म्हणून एक ऑक्टोबरला स्कॉटलंडच्या शेळीचं सिंगल मॉल्ट दुध पितात ते तुम्हाला स्मरून.
त्यात या विलेक्षनम्हदी तुम्ही मला तुमचा प्रशांत किशोर नेमलात .
तुम्हाला चमत्कारिक निर्णय घेण्याची सवयच आहे.
तरी मी तुम्हाला सांगत होतो की मला नेमू नका!
का म्हणजे?
अहो मी बामण.
तुमची हत्या करणाऱ्यांचा पोटजातवाला.
म्हणजे नव्या कायद्यानुसार गोडसेच .
समस्त भटांना धर्म नाही फक्त जात आहे.
ब्रिटिशांनी काही जाती गुन्हेगार ठरवल्या तर विद्वान देशी गोबेल्सनी एकच ठरवली.
बामण!
इन्फिनिटी पर्सेंट चोर साले.
तेंच्या आवशिक झवले कोले.
हा डायलॉग हिंदू मायनॉरिटीच्या बाबतीत आपण सहज म्हणू शकतो.
भटांची जात काढायला या देशात शिक्षाच नाही.
शक्य झाले तर , मेगॅस्थेनिस नावाच्या पगारी भाटाच्या नायशा झालेल्या पुस्तकाच्या चिंध्यांचे कपटे चिकटवून लिहिलेल्या सेकंडहँड पुस्तकातील गजालीचा हवाला देऊन बामणांचे गुणसूत्र ज्यू ठरवून ऑश्तविझ किंवा सॅबिबॉरच्या कॉन्सेंट्रेशन कॅंपातल्या घॅसचेंबरमधे ढकलण्याचा ठरावही करेल हे नवजात पाचडबुद्दी बामणियांचे नॅरेशन.
भट आणि मुसलमान यांना नायशे केले तर भारतात रामराज्य येईल असा आभास निर्माण करतात ही हेतू समान असलेली परस्परविरोधी नॅरेशन्स. एक आहे गोबेल्सचा समोरून फोटो तर दुसरा पाठमोरा.
मेगॅस्थेनिस प्लूटो ॲरिस्टॉटल हेंची शॅटासुद्दा न बगता तेंची ॐ केशवायन्मा नारायणान्मा माधवायन्मा असा म्हणत विद्वान म्हणून मिरवची आपनाक खोड हा ह्या निछ्छीत .
नाव अ डेज वॉटस् ॲप इज अ व्हिक्टोरिया ऑफ ईझी व्हर्च्यू. तिच्या छिनाल साम्राज्यातील , रिक्यामचोट आणि वेडझव्या न्यायाधिशांनी ठासून भरलेली ही स्युडो ट्रायब्युनल्स मला फ्रेंच राज्यक्रांतीची आठवण करून देतात .
तू नाय तुझ्या बापाने पाणी गढूळ केले होते तेव्हा तुला मी खाणार असे कोकराला सांगणाऱ्या, इंटेलेक्चुअल बनिया असलेल्या लांडग्याच्या गोष्टीची मला आठवण होते.
आय फिअर... हे असंच चालू दिलं तर दोज नॅरेशन्स विल टर्न इन टू द मोस्ट पॉवरफुल एंजिन्स ऑफ रेन ऑफ टेरर.
म्हणून मी धर्मांतर करून मुसलमान होण्याचा विचार करतो आहे.
का म्हणजे?
अहो ! सहा कोटीतून वीस कोटीत जाईन.
साडेतीन टक्यातून अकरा टक्यात जाईन.
आनंद वैद्य ऐवजी जनाब सईद हकीम होईन.
गणपतीची आरती म्हणण्या ऐवजी बांग देईन. काय फरक पडतो ?
सेफ तर होईन.
कारण इन इंडियन डेमॉक्रसी, राइट ऑर राँग, दोन पायांच्या प्राण्यांचा लार्ज वेडझवा कळप कॅरीज द पॉइंट. हे धर्मातीत सत्य आहे . कवडीकिमतीच्या भिकरचोट मुद्द्यांवर वितंडवाद घालत रहाणे आणि स्वतःचा सामुहिक नाश करून घेणे म्हणजे आयात केलेल्या माहितीवर जगणारा, सृजनशील नसलेला आधुनिक भारतातील जुनाट बुद्धीवाद.
मला एक सांगा.. तुमच्या सांगण्यावरून इंग्रजांच्या हिंदी पोलिसांचे दांडे खाणाऱ्या खुळपटांची पोरे आज कुठे आहेत? त्यांचे संसार बरबाद झाले, आणि कालपर्यंत पत्र्याच्या टपरीत रहाणारे टपोरी, राजकारणात आल्यावर दहा वीस वर्षात अब्जाधीश होऊन घटनेचे भाष्यकार झाले.
कसे झाले ?
आणि हे गणित, इन्कमटॅक्सइडीसीबिआयइंटेलिजन्सब्युरोरिसर्चॲंडॲनालिसिसविंग
यातील रामानुजम मंडळींना सुटत कसे नाय ?
तुमच्या, ' हे राम!' मुळे तुम्ही काँग्रेसवाल्यांच्या धर्मनिरपेक्षतेची गोची करता.
आणि तुमच्या ईश्वरअल्ला तेरो नाम मुळे हिंदुत्ववाद्यांची.
मग कसं देणार ते तुम्हाला तिकीट?
तर, एकला चलो रे म्हणत अपक्ष उभे राहिलात. कशाच्या जिवावर राहिलात? अहो नोटांवर तुमचा फोटो असला तरी तुमच्या खिशात नाय दमडी. तुमच्या पंचाला खिसाच नाय म्हणा. पैशे कसे वाटणार तुम्ही?
पैसे कोणासाठी म्हणजे?
अहो जन्ताजनार्दनासाठी ! निवडणूक कधी होते याची वाटच पहात असतात हे विवेकानंदांनी व्याख्यित केलेले बुद्धी दरिद्री नारायण ऊर्फ जन्ता. माणशी रेट ठरलेला असतो. सायंकालीन प्रभातफेऱ्या निघतात बॅट्रॅंचे फोकस मारत पान्दीपान्दीतून, तुमको दिया हुवा स्वराज्य लेंगे वापिस लेंगे म्हणत.
नथुरामने तीन गोळ्या झाडून तुमचा खून केला आणि नंतर आम्ही तुमच्या सत्याच्या प्रयोगावर असत्याच्या अनंत गोळ्या झाडून तुमचा वारंवार खून करून तुमचा फोटो जिवंत ठेवलाय.
पण तुम्ही आमची हरामखोरी विसरलात. आमच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवलात . आत्मविश्वासाने बेडकी सारखे फुगलात. उभे राहिलात. आम्ही तुम्हाला सोशल मिडियातून पल्ल्याला लावलं. तुम्ही बाळाशास्त्र्यांची पगडी घालून बसलेले रूपर्ट मरडॉक का बघितले नाहीत? का पेड न्यूज दिल्या नाहीत ?
अंती काय झालं ?
पडलात ना सणसणीत ?
बरं झालं छान झालं म्हातारीचं काम झालं.
कोणी करायला सांगितले होते तुम्हाला नसते उद्योग? महापुरुषांचे फोटो आणि पाली... सरकारी कार्यालयाच्या आणि भारतीय जनमानसाच्या भिंतींसाठी एकसमान असतात .
कपिल घोलप
कशाला उभे राहिलात तुम्ही. निवडणुकीत वापरायची शिवराळ भाषा तुम्हाला येते ? तुम्हाला निवडणूक मारायची तंत्रे माहिती नाहीत. बापुजी तुम्ही इन्व्हर्स ऑफ आउटडेट आहात. दोन लाख वर्षांनंतर माणसाने कसे वागावे हे तुम्ही आज सांगता? सर, यू आर नॉट अ पोलिटिशिअन नॉर अ फिलॉसॉफर यू आर जस्ट ॲन अनवाइज ओल्ड मॅन. भविष्यातील आकाशातून वर्तमानातील पृथ्वीवर पडलेला शुद्ध माणूस आहात तुम्ही, अ स्टोरीटेलर ऑफ अ ड्रीम सिक्वेन्स. दॅटस् वॉट हायली क्वॉलिफाइड, क्रूकेड बट एलिट इंडियन ब्रेन्स दॅट मिन्स थिंक टँक थिंक्स .
आम्ही शब्दशः मादरचोद आणि खोटारडे आहोत बापूजी. जालियनवाला बाग हत्याकांडात, विच वॉज चर्चिलच्या शब्दाचात 'अनअटरेबली मॉन्स्टरस,' नेता डायर असेल पण गोळ्या झाडणारे स्वामिनिष्ठ कोण होते?
अजूनही महापुरुषांचा बुवा करण्यात आम्ही पटाईत आहोत बापू.
शाळा आणि शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर तुमचा फोटो कोळिष्टकांच्या दोऱ्यांनी फाशी दिल्यासारखा लटकत असतो वर्षभर हे तुम्हाला स्वर्गातून दिसत असेलच. तरीही आमच्या स्थितप्रज्ञेला काहीही वाटत नाही याचे मला दुःख होते.
आजही खेडोपाडी पसरलेल्या, ब्लॅकमेलिंग करून जगणाऱ्या स्थानिक समाजसेवकांच्या पक्षनिरपेक्ष गँगींच्या आदर्शामुळे जयंतीलाल गांधी नावाच्या बर्थ डे बॉयमुळे आपल्याला दोन आक्टुंबरला हॉलिडे मिळतो असे शाळेतल्या पोरांना हळुहळू वाटू लागेल... आणि तेव्हा ती जगबुडीची सुरवात असेल. माणसांची उत्क्रांती डायनासॉर्सच्या दिशेने नेणारी .
हे राम म्हणा किंवा जय श्रीराम,
पण कथन कौशल्य असलेला कोणताही फालतू माणूस सीतेच्या चारित्र्यावर संशय घेउन तिला जिवंतपणी जमिनीत गाडण्याची शिक्षा फर्मावून साक्षात रामाला शरयूत उडी मारायला लावू शकतो आणि नंतरच्या पिढीतले षंढ त्या घटनेचे उदात्तीकरण करतात. खुनाला समाधी म्हणू लागतात. कारण बहुसंख्य जनता, सत्ययुगापासून ' मला काय त्याचे' अशा विचाराची असते,
हे धरणीमाते मी पवित्र असेन तर मला पोटात घे! हा न्याय होऊ शकतो ?
हे राम...
चरखा चला चलाके लेंगे स्वराज्य लेंगे वाले तथाकथित भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो!
अखेरीस बापूजी एक प्रश्न...
औरंगजेबासमोर चरखा चालवून स्वातंत्र्य मिळाले असते?
आनंद वैद्य, कुडाळ
25 - 12 - 2022
9422381468
Comments
Post a Comment